मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना

राज्यात 'अटल' सौर कृषीपंप योजना राबविण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयासमवेत राज्य शासनाने 1 लक्ष पारेषण विरहीत सौर कृषीपंप आस्थापित करण्यासाठी 3 वर्षांच्या कालावधीत टप्याटप्यात करण्यात येणार आहेत. पहिला टप्पा – २५००० नग दुसरा टप्पा – ५०००० नग तिसरा टप्पा – २५००० नग सौरकृषीपंपाचे फायदे दिवसा शेतीपंपास वीजेची उपलब्धता दिवसा विनाव्यतय अखंडित वीज पुरवठा वीज बिलापासून मुक्तता डिझेल पंपाच्या तुलनेत शून्य परिचलन खर्च पर्यावरण पुरक परिचलन शेती सिंचनाचा भाग वीज सबसिडीपासून पृथ्थकरण करणे औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती वीज ग्राहकांवरील क्रास सबसिडीचा बोजा कमीकरणे योजनेची ठळक वैशिष्टे पारेषण विरहित 1 लाख सौरकृषी पंप टप्प्या टप्प्यात उपलब्ध करुन देणे. सौर कृषीपंपासोबत दोन डि.सी. एल.ई.डी बल्ब, मोबाईल चार्जिंग व बॅटरी चार्जिंगची सुविधा (बॅटरी लाभार्थांनी घ्यावी) यांचा समावेश. योजनेची ठळक वैशिष्टे लाभार्थी निवडीचे पात्रता निकष – (३ व ५ अश्वशक्ती ) : शेतकऱ्याकडे शाश्वत जलस्त्रोत असलेली शेतजमीन असणे. पारंपारिक पध्दतीने कृषीपंपाकरिता विदयुत जोडणी न झालेले शेतकरी. ५ एकरापर्यंत शेतजमीन धारकास ३ अश्वशक्त...